एक छानसं तळं होतं. त्या तळ्यात एक कासव राहत होतं. ते खूपच प्रेमळ होतं. समोर जो कोणी येईल, त्याची ते आस्थेने चौकशी करीत असे. त्याच्या गप्पिष्ट स्वभावामळे त्याचे खूप मित्र बनले होते. या कासवाचे असेच दोन खास मित्र होते. ते हंस होते. ते हंस रोज त्या तलावावर येत आणि मग कासवासोबत गप्पा रंगत. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. परिसरातील सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. तलावातील पाणीही हळूहळू आटू लागले. ते इतके आटले की, त्याचा तळ दिसू लागला. त्यातील मासे तडफडून मरू लागले. त्यांना वाचविणे कठीणच होते. पण, कासवाचे हाल होणार, हे लक्षात आल्यानंतर हंस खूप दु:खी झाले. त्यांना सुचेना की, कासवाला कसे वाचवायचे? ते हंस अतिशय दु:खी अंत:करणाने कासवाशी गप्पा मारतात. बोलता बोलता कासवाबद्दलची चिंता ते व्यक्त करतात. शेवटी कासव हंसाना एक उपाय सुचवतो, ‘ मी एक काठी आणीन. ती मधोमध मी तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा. उडत - उडत जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे आहे का ते पाहू. तसे तळे असेल तर, तेथे आपण उतरू आणि राहू.
तात्पर्य : मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यास प्रसंगी जीवावरही बेतते.
Nice story
ReplyDeleteNice
DeleteT h x
ReplyDeleteNice exlent story really but it is full story a what
ReplyDelete